आंबोळगड किल्ला रत्नागिरी , राजापूर

आंबोळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात दोन किनारी दूर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड व यशवंत गड. "मुसाकाजी" या प्राचिन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही, पण जवळील गगनगिरी महाराजांच्या आश्रमात होऊ शकते.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. ना तटबंदी न वाड्याचे अवशेष.आंबोळगड हा

उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहिर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे.